संस्कार भारती पब्लिक स्कूल वरोरा येथे पहिल्यांदाच पदवी प्रदान समारंभ उत्साहात संपन्न

संस्कार भारती पब्लिक स्कूल वरोरा येथे पहिल्यांदाच पदवी प्रदान समारंभ उत्साहात संपन्न वरोरा, ३० एप्रिल – स्थानिक संस्कार भारती पब्लिक स्कूलमध्ये पूर्व प्राथमिक वर्ग (नर्सरी ते युकेजी) साठी पहिल्यांदाच पदवी प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षा अपेक्षा मालू होत्या, तर प्रमुख मार्गदर्शक प्राचार्या राणी पटेल, उपप्राचार्या श्रद्धा चौबे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पालक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिती शास्त्रकार यांनी केले. या समारंभात विद्यार्थ्यांना एक-एक करून स्टेजवर बोलावून त्यांना डिग्री सर्टिफिकेट व पुष्पगुच्छ देऊन पालकांसह सन्मानित करण्यात आले. विद्यार्थी आणि पालकांनी मनोगत व्यक्त केले. पालकांनी आपल्या पाल्यांना डिग्री ड्रेसमध्ये पाहून भावी इंजिनियर, डॉक्टर, जिल्हाधिकारी या रूपात अनुभवले, त्यामुळे सर्वच उत्साही झाले. प्राचार्या राणी पटेल यांनी मार्गदर्शन केले तर आभार प्रदर्शन उज्वला झंजल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सारिका दातारकर, भाग्यश्री फेतफुलवार यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

*विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या संवाद बैठका*

*विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या संवाद बैठका*

*4 आक्टोबर ला गडचिरोलीपासून सुरू होऊन 9 आक्टोबरला नागपुरात संवाद बैठकीचा समारोप*

अतुल कोल्हे भद्रावतो :-
                केंद्र व राज्य शासनाने गेल्या वर्षभरापासून घेतलेल्या निर्णयांची माहिती देणे. 24 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र सरकारने क्रिमी लेयरबाबत घेतलेल्या निर्णयाबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये 4 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर या कालावधीत संवाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे म्हणाले की, सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती अजूनही समाजापर्यंत पोहोचलेली नाही. ही माहिती संवाद सभेच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल.24 सप्टेंबर रोजी क्रिमी लेयरची मर्यादा 8 लाख रुपयांपर्यंत वाढवल्याने लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले आणि त्याबद्दल त्यांचे आभारही मानले जातील.संवाद सभा  गडचिरोली जिल्ह्यातून ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून या यात्रेचे नेतृत्व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर करणार असून, गोदिया, भंडारा, वर्धा, खामगाव, वाशीम, यवतमाळ, वणी, चिमूर मार्गे ९ ऑक्टोबरला नागपुरात समारोप होणार आहे.  राष्ट्रीय ओबीसी  महासंघाचे महासचिव यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून आता पर्यंत संघटनेने केलेल्या कामाचा आढावा मांडला ,ज्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात ओबीसी मुद्द्याचे समर्थन केले जाईल, त्या पक्षांचे ओबीसी महासंघ स्वागत करेल.
डॉ तायवाडे म्हणाले की, महासंघ संविधानाच्या मर्यादेत राहून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी सरकारशी लढा देत आहे. यापुढील काळातही संघर्ष सुरूच राहणार आहे. जात जनगणना हा आपला मुख्य मुद्दा आहे. आता देशातील विरोधी पक्षनेत्यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला आहेत.हे ओबीसींसाठी हे चांगले लक्षण आहे. ओबीसी कोट्यातील मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत ते म्हणाले की, सरकारने त्यांना लेखी आश्वासन दिले आहे.त्यामुळे मराठ्यांना ओबीसी कोट्यातून कधीच आरक्षण मिळू शकत नाही. ते म्हणाले की, महासंघात सर्व राजकीय पक्षांचे सदस्य समाविष्ट आहेत. सर्वांना या संवाद यात्रेत  आमंत्रित केले आहे.ज्या राजकीय पक्षाच्या विधानसभा निवडणुकीतील प्रमुख  जाहीरनाम्यात ओबीसींच्या हिताचे मुद्दे असतील त्या पक्षासोबत ओबीसी समाज राहील. 

सभेला  शाम  लेडे, प्रकाश साबळे, शरद वानखेडे, सुभाष घाटे, गुनेश्वर  आरिकर, ओबीसी योद्धा रवींद्र टोगे ,सुषमा भड, ज्योती ढोकणे, रत्नमाला पिसे, रेखाताई बारहाते,,  उपस्थित होते, या सभेला गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, लातुर , हिंगोली,जालना, गोंदिया, भंडारा, याठीकानाहुन प्रमुख, महिला  ,युवक, कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमांचे संचलन रुषभ राऊत यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार निलेश कोडे यांनी केले, बैठकीच्या यशस्वते साठी राजू  चौधरी, रामदास कामडी , कवडू लोहकरे,विनोद हजारे, दिलीप हरणे, राहुल भांडेकर,रुपेश राऊत, घनश्याम अकोले,  आणि इतरांनी सहकार्य केले.

Comments