विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक – पालकमंत्री डॉ. वुईकेØ महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्नØ उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कारØ महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप

विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक  – पालकमंत्री डॉ. वुईके Ø महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न Ø उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कार Ø महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप चंद्रपूर, दि. 01 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत 'विकसीत भारताचे' उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा 'विकसीत महाराष्ट्र' घडविण्याचा संकल्प केला आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाचा विकास, हाच आमच्या सरकारचा मुख्य केंद्रबिंदू आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन यासाठी काम करीत असून विकसीत महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली. पोलिस मुख्यालय येथे शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, म...

आता एकच लक्ष राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी बाळासाहेब ठाकरे*शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) महाविकासआघाडी पदाधिकारी मेळावा संपन्न*

आता एकच लक्ष राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी बाळासाहेब ठाकरे
*शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) महाविकासआघाडी पदाधिकारी मेळावा संपन्न*

*मेळाव्यात राज्याचे पुढील मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे च होतील यासाठी एकच निर्धार सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मिळून करण्यात आला.*

वरोरा 
चेतन लुतडे वरोरा 

        शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) महाविकासआघाडी पदाधिकारी मेळावा १६ ऑगस्ट २०२३ ला षणमुखांनद सभागृह, मुंबई येथे पार पडला. महाराष्ट्र राज्यात होवु घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकासआघाडीतील घटक पक्षाने एकजुटीने जनतेसमोर जावुन महाविकासआघाडीत उमेदवाराचा विजय संपादीत करुन महाराष्ट्र राज्यात सुरु असलेला महायुतीचा व गद्दारांचा भोंगळ कारभार, राज्यातील मोठे उद्योग सतत गुजरात व ईतर राज्यात नेण्याचा धंदाच भाड्याने जमवलेल्या पक्षाने लावला आहे. त्यामुळे अश्या असंवेदनशील व घटनाबाह्य सरकारला राज्याबाहेर हद्दपार करण्यासाठी व जनतेच्या हितासाठी, राज्यात खरी लोकशाही नांदवण्यासाठी पुन्हा एकदा पक्षप्रमुख व राज्याचे कुटुंबप्रमुख, माजी मुख्यमंत्री आदरणीय उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर विराजन करण्यासाठी राज्याच्या २८८  विधानसभेतील कोणताही मतदार संघ हा महाविकासआघाडीच्या मित्र पक्षाला सुटला तरी सर्व  शिवसैनिकांनी व पदाधिकारी यांनी मनात कोणतीही शंका न बाळगता राज्यात आता एकदा पुन्हा भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हावे, अशा सूचना पक्षश्रेष्ठींनी केल्या आहेत.

या मेळाव्यात राज्याचे पुढील मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे च होतील यासाठी एकच निर्धार सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मिळून करण्यात आला.


Comments