विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक – पालकमंत्री डॉ. वुईकेØ महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्नØ उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कारØ महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप

विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक  – पालकमंत्री डॉ. वुईके Ø महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न Ø उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कार Ø महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप चंद्रपूर, दि. 01 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत 'विकसीत भारताचे' उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा 'विकसीत महाराष्ट्र' घडविण्याचा संकल्प केला आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाचा विकास, हाच आमच्या सरकारचा मुख्य केंद्रबिंदू आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन यासाठी काम करीत असून विकसीत महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली. पोलिस मुख्यालय येथे शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, म...

*भद्रावती येथे 'आपले निसर्ग, पर्यावरण व आपले आरोग्य' यावर जनजागृती कार्यक्रम**इनरव्हील क्लब व इको प्रो यांचा संयुक्त उपक्रम**प्रख्यात पर्यावरणवादी बंडू धोत्रे यांची उपस्थिती*

*भद्रावती येथे 'आपले निसर्ग, पर्यावरण व आपले आरोग्य' यावर जनजागृती कार्यक्रम*

*इनरव्हील क्लब व इको प्रो यांचा संयुक्त उपक्रम*

*प्रख्यात पर्यावरणवादी बंडू धोत्रे यांची उपस्थिती*

अतुल कोल्हे भद्रावती :- 
               स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर स्थानिक इनरव्हील क्लब व इकोप्रो यांच्या संयुक्त विद्यमाने येथील लोकमान्य विद्यालयाच्या प्राणांगात आपले निसर्ग पर्यावरण व आपले आरोग्य या विषयावर जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला .

या कार्यक्रमाला प्रमुख वकत्ते म्हणून प्रख्यात पर्यावरणवादी मा. बंडू धोत्रे होते .यावेळी उपस्थिताना निसर्ग पर्यावरण व आपले आरोग्य या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितांनी सुद्धा प्रश्न विचारून मानवी जीवनात येत असलेल्या आरोग्य विषयी  समस्यांचे निराकरण कशाप्रकारे करायचेअसे अनेक प्रश्न मांडण्यात आले यावर बंडू धोत्रे यांनी यावर विस्तृत असे मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेमा पोटदुखे, सूत्रसंचालन सुनिता खंडाळकर , तर उपस्थित त्यांचे आभार जयश्री बलीनवार यांनी मानले .
या कार्यक्रमाला वर्षा धानोरकर, तृप्ती हिरादेवे, केशीनी हटवार, विश्रांती उराडे, शुभांगी बोरकुटे, स्नेहा कावडे, मनीषा ढुमणे, लता टिकरे, रश्मी बिसेन, कविता सुपी ,शेंडे मॅडम आदींसह मोठ्या संख्येने शहरातील नागरिक व रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते.

Comments