प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

जनतेची सेवा हेच माझे कर्तव्य - खासदार प्रतिभा धानोरकर

जनतेची सेवा हेच माझे कर्तव्य - खासदार प्रतिभा धानोरकर 

वरोरा 

लोकसभा निवडणुकीत जनतेने माझ्यावर विश्वास दाखवल्याने मी खासदार झाली आहे .त्यामुळे जनतेची सेवा करणे हेच माझे प्रथम कर्तव्य असून त्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वणी येथे आयोजित जनता दरबाराच्या वेळी सांगितले. 
लोकसभेत मला जनतेने प्रचंड बहुमताने निवडून दिल्याने जनतेनी सांगितलेली काम कर्तव्य समजून मी करणार आहे. लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्यात मी प्रामुख्याने वेळोवेळी जनता दरबार घेणार आहे. या माध्यमातून जनतेशी देखील नाळ जुळवण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. आरोग्य, वीज, रस्ते व व महसुली कामे तात्काळ व्हावी या करीता देखील मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करणार आहे. अधिकाऱ्यांनी देखील सामान्य नागरिकांची कामे त्वरित करून द्यावी असे देखील मत यावेळी खासदार धानोरकर यांनी व्यक्त केले. यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या समस्यांची निवेदने खासदार धानोरकर  यांना दिली.

Comments