प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांचे व्दारा जनतेला जाहीररीत्या आवाहन .आपात्कालीन परिस्थितीसाठी शिवसैनिकांनी तत्पर राहावे.

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांचे व्दारा जनतेला जाहीररीत्या आवाहन .

आपात्कालीन परिस्थितीसाठी शिवसैनिकांनी तत्पर राहावे.

फक्त बातमी 
चेतन लुतडे वरोरा 
चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असुन शेतकरी बांधवांच्या शेतीचे, घरांचे, गोठा, जनावरे, पाळीव प्राणी आदींचे नुकसान झाले आहे. धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अनेक नदी, नाल्यातील पाण्याची पातळी वाढली आहे. काही ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत. तरी नदी, नाल्या जवळच्या गावांना, रहीवास्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आपल्या संपूर्ण कुटुंबाची काळजी घ्या. सुरक्षित स्थळी कुटुंब व जनावरे हलवा, वन्य जीवांपासून सावध रहा, पाणी गरम करुन प्या, आरोग्याची काळजी घ्या, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा.
विशेषत: वरोरा, भद्रावती तालुका प्रशासनासोबत आम्ही संपर्कात आहोत, आमचे सहकार्य राहील. आमचा 'एक हात मदतीचा' हा उपक्रम सुरूच आहे. आत्मविश्वास बाळगा... आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. 

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व पदाधिकारी, शाखाप्रमुख यांनी भविष्यात उद्भवणाऱ्या आपातकालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी स्वत:ची व कुटुंबाची काळजी घेत जनतेच्या मदतीसाठी तत्पर रहावे, कोणत्याही अतीआवश्यक मदतीकरिता माझ्याशी संपर्क साधावा.

सन २०२२ मध्ये जिल्ह्यात आलेल्या पुर परिस्थितीवर आपण सर्वांनी मात केली होती. तसाच आत्मविश्वास बाळगा, या सकंटावर सुध्दा आपण सारे मिळून मात करू या पद्धतीचे आव्हान रवींद्र शिंदे यांनी केले आहे.


संपर्क :रविंद्र शिंदे जिल्हाप्रमुख
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
9823752077

Comments