खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार  पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला बातमी: वरोरा 16/4/26 वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक  पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. “संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे य...

*अखेर… त्या तिघांचेही मृतदेह सापडले**विठ्ठलवाडी परीसरात शोकाकुल वातावरण*

*अखेर… त्या तिघांचेही मृतदेह सापडले*

*विठ्ठलवाडी परीसरात शोकाकुल वातावरण*

अतुल कोल्हे भद्रावती :- 
                          महाशिवरात्रीनिमित्त वरोरा तालुक्यातील भटाळी येथे दर्शणाकरीता गेलेले काही तरुण वर्धा नदीत आंघोळ करण्यासाठी घडली. विठ्ठलवाडी येथे वास्तव्यास असलेल्या मित्रांचा समूहच नदी पत्रात उतरले त्यातील तीन तरुण नदीत बुडाल्याची घटना 8 मार्चला सायं.5 वाजताच्या सुमारास घडली. रात्री त्यांचा नदी पात्रात शोध घेतला असता कोणताच थांगपत्ता नदीपात्रात लागला नव्हता. म्हणून 9 मार्च रोजी सकाळीच रेस्क्यू टीमद्वारे शोधमोहीम राबविण्यात आली असता नदी पात्रात तरुणांचा शोध घेतला असता आधी संकेत पुंडलिक नगराळे याचा मृतदेहच आढळून आला लगेचच अनिरुद्ध चाफले परंतु तिसरा तरुण 9 मार्च ला सायंकाळ पर्यंत शोध घेऊनही हर्षद चाफले हा सापडला नव्हता शेवटी 10 मार्च चा पहाटे नदीचा काठावर तरंगतांना दिसून आला.


शहरातील विठ्ठलवाडी परिसरातील मित्र महाशिवरात्रीनिमित्त वरोरा तालुक्यातील भटाळी येथे मंदिर दर्शनाकरिता गेले होते. भटाळी वरून परत येतांना त्यांना मार्गातील वर्धा नदीवर आंघोळीचा मोह सुटला.हे सर्वच मित्र वर्धा नदी पात्रात आंघोळी करीता गेले. दरम्यान आंघोळ करतांना पाण्याचा अंदाज न आल्याने हर्षद अतिश चाफले वय अंदाजे १६ वर्ष ,चुलत भाऊ अनिरुद्ध चाफले २२ व  संकेत पुंडलिक नगराळे वय अंदाजे २६ वर्ष हे अंगोळीला उतरले असता त्यातील दिघेही जण वाहून गेल्याची घटना काल दि.8 मार्च रोजी हृदयद्रावक घटना घडली. अखेर सकाळी 9 च्या दरम्यान ता.9 मार्च रोजी रेस्क्यू टीमद्वारे शोधमोहीम राबविण्यात आली असता नदी पात्रात तरुणांचा शोध घेतला असता खोलवर वाहून गेलेल्या तिन तरुणांपैकी दोघांचे मृतदेहच हाती लागलेहोते.या मयत दोन्ही तरुणांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरीता पाठविण्यात आले. त्यातील मयत संकेत नगराळे यांचे पार्थिव शरीर कुटुंबीयांना सोपविण्यात आले व त्याचा पार्थिवावर 9 मार्च रोजी अत्यंसंस्कार विधीही करण्यात आले . 9 मार्च रोजी सायं पर्यंत शोधूनही हर्ष चा मृतदेह सापडलाच नव्हता शेवटी 10 मार्च चा पहाटे हर्ष चा मृतदेह नदीचा काठावर तरंगताना दिसून आला.

त्या हर्ष चा मृतदेहला शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरीता पाठविण्यात आले.पुढील तपास वणी ठाणेदार P.I अनिल बेहरानी यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस करीत आहे.

Comments