वेकोलीच्या एकोना खाणीतून मोठ्या प्रमाणात कोळशाची चोरी; पाच सुरक्षा रक्षकांनचे निलंबन वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

वेकोलीच्या एकोना खाणीतून मोठ्या प्रमाणात कोळशाची चोरी; पाच सुरक्षा रक्षकांनचे निलंबन   वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. वरोरा: ५/३/२०२६ ,११:०६pm वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (वेकोली) अंतर्गत माजरी परिसरातील वरोरा -एकोना उपप्रादेशिक कोळसा खाण क्रमांक २ मधून मोठ्या प्रमाणात कोळसा चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही चोरी २६ आणि २७ फेब्रुवारी रोजी घडली असून, वेकोली मार्फत वरोरा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात  बडे मासे अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच वेकोलीच्या महाव्यव्यवस्थापक राकेश प्रसाद यांनी तात्काळ कारवाई करत या प्रकरणातील निष्काळजीपणाबद्दल पाच सुरक्षा रक्षकांना निलंबित केले आहे. निलंबित करण्यात आलेल्या रक्षकांमध्ये संदेश बेलेकर, गोकुळ डंभारे, शंकर बोबडे, लव पारखी आणि मनोज माथनकर यांचा समावेश आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि नोंदींमधील अनियमिततेमुळे हा प्रकार उघडकीस आला. मिळालेल्या माहितीनुसार, वि. वि. ट्रान्सपोर्ट कंपनी, नागपूर या कंपनीने २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता खाण परिसरातून कोळ...

*अखेर… त्या तिघांचेही मृतदेह सापडले**विठ्ठलवाडी परीसरात शोकाकुल वातावरण*

*अखेर… त्या तिघांचेही मृतदेह सापडले*

*विठ्ठलवाडी परीसरात शोकाकुल वातावरण*

अतुल कोल्हे भद्रावती :- 
                          महाशिवरात्रीनिमित्त वरोरा तालुक्यातील भटाळी येथे दर्शणाकरीता गेलेले काही तरुण वर्धा नदीत आंघोळ करण्यासाठी घडली. विठ्ठलवाडी येथे वास्तव्यास असलेल्या मित्रांचा समूहच नदी पत्रात उतरले त्यातील तीन तरुण नदीत बुडाल्याची घटना 8 मार्चला सायं.5 वाजताच्या सुमारास घडली. रात्री त्यांचा नदी पात्रात शोध घेतला असता कोणताच थांगपत्ता नदीपात्रात लागला नव्हता. म्हणून 9 मार्च रोजी सकाळीच रेस्क्यू टीमद्वारे शोधमोहीम राबविण्यात आली असता नदी पात्रात तरुणांचा शोध घेतला असता आधी संकेत पुंडलिक नगराळे याचा मृतदेहच आढळून आला लगेचच अनिरुद्ध चाफले परंतु तिसरा तरुण 9 मार्च ला सायंकाळ पर्यंत शोध घेऊनही हर्षद चाफले हा सापडला नव्हता शेवटी 10 मार्च चा पहाटे नदीचा काठावर तरंगतांना दिसून आला.


शहरातील विठ्ठलवाडी परिसरातील मित्र महाशिवरात्रीनिमित्त वरोरा तालुक्यातील भटाळी येथे मंदिर दर्शनाकरिता गेले होते. भटाळी वरून परत येतांना त्यांना मार्गातील वर्धा नदीवर आंघोळीचा मोह सुटला.हे सर्वच मित्र वर्धा नदी पात्रात आंघोळी करीता गेले. दरम्यान आंघोळ करतांना पाण्याचा अंदाज न आल्याने हर्षद अतिश चाफले वय अंदाजे १६ वर्ष ,चुलत भाऊ अनिरुद्ध चाफले २२ व  संकेत पुंडलिक नगराळे वय अंदाजे २६ वर्ष हे अंगोळीला उतरले असता त्यातील दिघेही जण वाहून गेल्याची घटना काल दि.8 मार्च रोजी हृदयद्रावक घटना घडली. अखेर सकाळी 9 च्या दरम्यान ता.9 मार्च रोजी रेस्क्यू टीमद्वारे शोधमोहीम राबविण्यात आली असता नदी पात्रात तरुणांचा शोध घेतला असता खोलवर वाहून गेलेल्या तिन तरुणांपैकी दोघांचे मृतदेहच हाती लागलेहोते.या मयत दोन्ही तरुणांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरीता पाठविण्यात आले. त्यातील मयत संकेत नगराळे यांचे पार्थिव शरीर कुटुंबीयांना सोपविण्यात आले व त्याचा पार्थिवावर 9 मार्च रोजी अत्यंसंस्कार विधीही करण्यात आले . 9 मार्च रोजी सायं पर्यंत शोधूनही हर्ष चा मृतदेह सापडलाच नव्हता शेवटी 10 मार्च चा पहाटे हर्ष चा मृतदेह नदीचा काठावर तरंगताना दिसून आला.

त्या हर्ष चा मृतदेहला शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरीता पाठविण्यात आले.पुढील तपास वणी ठाणेदार P.I अनिल बेहरानी यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस करीत आहे.

Comments