कॅन्सरशी झुंज देणाऱ्या रोहीला ट्रस्टचा आधार; ‘बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत मदतीचा हातमाणुसकी जपणाऱ्या उपक्रमातून १० वर्षीय चिमुकलीच्या उपचारांना बळ

कॅन्सरशी झुंज देणाऱ्या रोहीला ट्रस्टचा आधार; ‘बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत मदतीचा हात माणुसकी जपणाऱ्या उपक्रमातून १० वर्षीय चिमुकलीच्या उपचारांना बळ बातमी: चंद्रपूर : सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत असलेल्या स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर तर्फे कॅन्सरशी झुंज देणाऱ्या १० वर्षीय कुमारी रोही सिंह हिला मदतीचा हात देण्यात आला आहे. ‘श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत ही मदत करण्यात आली असून, तिच्या उपचारांसाठी महत्त्वाचे सहकार्य मिळाले आहे. मुळचे उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील नागेंद्र सिंह हे सध्या नागपूर येथे उदरनिर्वाहासाठी वास्तव्यास आहेत. त्यांची अल्पवयीन मुलगी रोही सिंह हिला हाडांचा कॅन्सर (Bone Cancer) झाला असून, या गंभीर आजारामुळे संपूर्ण कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. अशा कठीण परिस्थितीत ट्रस्टने पुढाकार घेत तिच्या उपचारांसाठी आर्थिक तसेच नैतिक आधार दिला आहे. या उपक्रमातून केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर एका निरागस मुलीला नव्याने जगण्याची आशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रोही ही या आजारावर मात करून पुन्हा आनंदाने जीवन...

वर्धा पावर विद्युत निर्मिती प्रकल्पात कोळशासोबत बायोमॉस वापरण्याला सुरुवात * कोळशाची बचत आणि कार्बनडाय ऑक्साइडवर नियंत्रण

वर्धा पावर विद्युत निर्मिती प्रकल्पात कोळशासोबत बायोमॉस वापरण्याला सुरुवात 
* कोळशाची बचत आणि कार्बनडाय ऑक्साइडवर नियंत्रण
 वरोरा:  येथील औद्योगिक वसाहत क्षेत्रामध्ये असलेल्या साई वर्धा पावर जनरेशन प्रा. ली. या विद्युत निर्मिती प्रकल्पात कोळसा आणि बायोमासचे मिश्रण करून विद्युत निर्मिती करण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे कोळशाची बचत आणि वातावरणात सोडल्या जाणाऱ्या कार्बनडाय ऑक्साइड वायूच्या प्रमाणावर नियंत्रण येणार असल्याचे म्हटले जात आहे.  केंद्र शासनाच्या विद्युत मंत्रालयाने आणलेल्या समर्थ मिशन योजनेनुसार कोळशावर चालणाऱ्या विद्युत निर्मिती प्रकल्पात कोळशासोबतच ७ टक्के बायोमासचे मिश्रण करून विद्युत निर्मिती करण्याचे निर्देश सर्व संबंधित विद्युत निर्मिती केंद्रांना देण्यात आले होते. त्याचे तंतोतंतपालन वरोरा औद्योगिक वसाहत क्षेत्रामध्ये असणाऱ्या साई वर्धा पावर विद्युत निर्मिती केंद्राने केले आहे. साई वर्धा पावर जनरेशन प्रायव्हेट लिमिटेड या विद्युत निर्मिती प्रकल्पात १३५ मेगावॅट वीज निर्मितीचे चार संच आहेत. या केंद्रातुन ५४० मेगावॅट विद्युत निर्मिती होत असते. सदर विद्युत निर्मिती करणाऱ्या केंद्राने कोळशासोबत ७% बायोमास प्लेट्सचे यशस्वी प्रज्वलन करून विद्युत निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे कोळशाची बचत होत होणार असून त्यासोबतच वातावरणात सोडल्या जाणाऱ्या कार्बन डाय-ऑक्साइड वायूच्या प्रमाणावर देखील नियंत्रण मिळविले गेले आहे.

Comments