विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक – पालकमंत्री डॉ. वुईकेØ महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्नØ उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कारØ महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप

विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक  – पालकमंत्री डॉ. वुईके Ø महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न Ø उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कार Ø महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप चंद्रपूर, दि. 01 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत 'विकसीत भारताचे' उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा 'विकसीत महाराष्ट्र' घडविण्याचा संकल्प केला आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाचा विकास, हाच आमच्या सरकारचा मुख्य केंद्रबिंदू आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन यासाठी काम करीत असून विकसीत महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली. पोलिस मुख्यालय येथे शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, म...

वर्धा पावर विद्युत निर्मिती प्रकल्पात कोळशासोबत बायोमॉस वापरण्याला सुरुवात * कोळशाची बचत आणि कार्बनडाय ऑक्साइडवर नियंत्रण

वर्धा पावर विद्युत निर्मिती प्रकल्पात कोळशासोबत बायोमॉस वापरण्याला सुरुवात 
* कोळशाची बचत आणि कार्बनडाय ऑक्साइडवर नियंत्रण
 वरोरा:  येथील औद्योगिक वसाहत क्षेत्रामध्ये असलेल्या साई वर्धा पावर जनरेशन प्रा. ली. या विद्युत निर्मिती प्रकल्पात कोळसा आणि बायोमासचे मिश्रण करून विद्युत निर्मिती करण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे कोळशाची बचत आणि वातावरणात सोडल्या जाणाऱ्या कार्बनडाय ऑक्साइड वायूच्या प्रमाणावर नियंत्रण येणार असल्याचे म्हटले जात आहे.  केंद्र शासनाच्या विद्युत मंत्रालयाने आणलेल्या समर्थ मिशन योजनेनुसार कोळशावर चालणाऱ्या विद्युत निर्मिती प्रकल्पात कोळशासोबतच ७ टक्के बायोमासचे मिश्रण करून विद्युत निर्मिती करण्याचे निर्देश सर्व संबंधित विद्युत निर्मिती केंद्रांना देण्यात आले होते. त्याचे तंतोतंतपालन वरोरा औद्योगिक वसाहत क्षेत्रामध्ये असणाऱ्या साई वर्धा पावर विद्युत निर्मिती केंद्राने केले आहे. साई वर्धा पावर जनरेशन प्रायव्हेट लिमिटेड या विद्युत निर्मिती प्रकल्पात १३५ मेगावॅट वीज निर्मितीचे चार संच आहेत. या केंद्रातुन ५४० मेगावॅट विद्युत निर्मिती होत असते. सदर विद्युत निर्मिती करणाऱ्या केंद्राने कोळशासोबत ७% बायोमास प्लेट्सचे यशस्वी प्रज्वलन करून विद्युत निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे कोळशाची बचत होत होणार असून त्यासोबतच वातावरणात सोडल्या जाणाऱ्या कार्बन डाय-ऑक्साइड वायूच्या प्रमाणावर देखील नियंत्रण मिळविले गेले आहे.

Comments