वरोरा-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वारासह मित्राचा जागीच मृत्यू

वरोरा-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वारासह मित्राचा जागीच मृत्यू बातमी: चेतन लूतडे/4/5/26 वरोरा : चंद्रपूर ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील टाकळी ते नंदोरी दरम्यान रविवारी (दि. 03 मे) रात्री भीषण अपघात घडून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खानगाव (ता. हिंगणघाट, जि. वर्धा) येथील चंद्रशेखर दत्तुजी वाल्दे (वय 27) व त्यांचा मित्र मयुर प्रभाकर हाडके (वय 30) हे दोघे दुचाकीने (MH-32-BA-7386, होंडा शाईन) चंद्रपूरहून नागपूरकडे जात होते. टाकळी ते नंदोरी दरम्यान समोरून येणाऱ्या महिंद्रा बोलेरो पिकअप (MH-34-BQ-0156) वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार चंद्रशेखर वाल्दे व त्यांचा मित्र मयुर हाडके यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर दोघांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी बोलेरो पिकअप चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा आरोप करण्यात आला असून, त्याच्याविरुद्ध वरोरा प...

आष्टी काकडे येथील बेपत्ता इसमाचा गावातील शेतशिवारातच सापडला मृतदेह. भद्रावती.

आष्टी काकडे येथील बेपत्ता इसमाचा गावातील शेतशिवारातच सापडला मृतदेह.
 भद्रावती.
 बारा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तालुक्यातील आष्टी काकडे येथील एका 57 वर्षीय इसमाचा अखेर गावातील शेतशिवारातच मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने गाव परिसरात खळबळ उडाली आहे.वामन दादाजी काकडे, वय 57 वर्ष, राहणार आष्टी काकडे. असे या मृतक इसमाचे नाव आहे. या घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन आवश्यक ती कारवाई केली व मृतदेह भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात शवाविच्छेदनासाठी पाठविला. मृतक वामन दादाजी काकडे हा गेल्या बारा दिवसांपासून घरातून निघून गेलेला होता. त्याच्या बेपत्ता असल्याची तक्रार भद्रावती पोलिसात देण्यात आली होती. आज सकाळी दहा वाजताच्या दरम्यान त्याचा मृतदेह गावातील एका शेतशिवारातच आढळून आला. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

Comments